भारताने 'यूएन'मध्ये पॅलेस्टाइनच्या बाजूने मतदान केले

पीटीआय, न्यूयॉर्क
इस्त्रायलने १९६७पासून
बळकावलेला पॅलेस्टिनी भूभाग सोडावा, अशी मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले. यामध्ये इस्रायलच्या ताब्यातील पूर्व जेरुसलेमचाही भाग आहे. ठरावात पश्चिम आशियामध्ये सर्वसमावेशक आणि दीर्घ काळ शांततेसाठी आवाहनही केले आहे.
'पॅलेस्टाइनच्या समस्येचे शांततापूर्ण निवारण' असे या
ठरावाचे नाव असून, सेनेगलने हा ठराव मांडला. भारतासह १५७ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, इस्रायल आणि अमेरिकेसह आठ देशांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले. या ठरावानुसार, इस्रायलने पूर्व जेरुसलेमसह १९६७ पासून बळकावलेला पॅलेस्टिनी भूभाग सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पॅलेस्टिनी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या हक्कांची, स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वाच्या हक्काची जाणीव इस्रायलला व्हावी, असेही म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा